आजचा विषय तुमच्यापैकी अनेकांना कदाचित काहीसा कठीण वाटेल. पण जेव्हा अर्थव्यवस्थेमुळे कठीण निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा टीममधून लोक कमी करायची वेळ आली आहे की नाही हे कसं ओळखायचं?
कधी-कधी कमी लोक म्हणजे जास्त ताकद! (Less is More!)
“तुमच्या टीममध्ये जर नकारात्मक, भीती असणारे लोक असतील, तर ते संपूर्ण टीमचं नुकसान करतात. अशा लोकांना घरी पाठवणं कधी-कधी महत्त्वाचं असतं.”
काळजीपूर्वकता (Carefulness)
“टीममधली निष्काळजी, Careless लोकं खरी धोकादायक असतात..”
खरं आयुष्य, खरं नेतृत्व!
टीमच्या संख्येपेक्षा टीमच्या गुणवत्तेला महत्त्व द्या. Quality always beats quantity. माझ्या स्वतःच्या टीममध्ये आम्ही हेच सिद्ध केलंय. इतर कंपन्यांमध्ये ५० ते १०० लोकं ज्या कामासाठी लागतात तेच काम आम्ही अवघ्या १५ जणांत करतो—आणि तेही अधिक उत्तम परिणामांसोबत.यासाठी महत्त्वाचं आहे “योग्य लोकांना टीममध्ये घेणं (Recruitment)“, आणि तितकंच महत्त्वाचं आहे “अयोग्य, नकारात्मक आणि ढिलाई दाखवणाऱ्या लोकांना टीममधून बाहेर काढणं (Excusing)“.
समारोप:
लीडर म्हणून कठीण निर्णय घ्यायला घाबरू नका. योग्य लोकांना निवडा आणि योग्य वेळी चुकीच्या लोकांना बाहेर काढा. “कमी लोक असले तरी चांगले लोक असावेत. कारण तेच तुम्हाला विजय मिळवून देतील.“म्हणूनच म्हणतो,
“The strength of your team is not in numbers, but in character and commitment!”
चला तर मग, “Unbeatable Team” तयार करायला सुरुवात करा, आणि आयुष्यातील प्रत्येक युद्ध जिंका!
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत नक्की सांगा बरं का!